Friday, February 4, 2011

रबर लागवड करायची आहे, हवामान कसे हवे, चीक कसा गोळा करावा?

रबराची वाढ उष्ण व दमट हवामानात चांगली होते. रबर वृक्षांच्या जलद वाढीसाठी सरासरी 2000 ते 3000 मि.मी. पाऊस आवश्‍यक असतो. भरपूर सूर्यप्रकाश व 75 ते 95 टक्के आर्द्रता असलेल्या परिसरात वाढ चांगली होते. 21 ते 35 अंश सेल्सिअस तापमान मानवते. चांगला निचरा होणारी, आम्लधर्मीय, साधारण उताराची जमीन लागते. कोकणात या बाबींची अनुकूलता असल्याने तेथे रबर लागवड जास्त प्रमाणात होते. 5 ु 5 मीटर अंतरावर लागवड करावी. 75 ु 75 ु 75 सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. दोन आठवडे खड्डे उघडे ठेवावेत. लागवड जून महिन्यात पहिला पाऊस पडल्याबरोबर करावी. झाडापासून चीक काढण्याच्या क्रियेला "टॅपिंग' असे म्हणतात. जमिनीपासून 125 सें.मी. अंतरावर जेव्हा खोडाची गोलाई 55 सें.मी. होते, त्या वेळी ही झाडे टॅपिंग करण्यास योग्य असल्याचे समजावे. कलमांना जमिनीपासून 125 सें.मी. उंचीवर 30 अंशांचा कोन करून उतरती खाच पाडून मर्यादित प्रमाणात क्रमशः साल काढली जाते. साल काढलेल्या ठिकाणी खाचेच्या खाली नारळाची करवंटी अथवा प्लॅस्टिक कप तारेने झाडाला बांधला जातो व त्यात चीक गोळा करण्यात येतो. रबर झाडाचे एक दिवसाआड टॅपिंग करण्यात येते. सूर्योदयापूर्वी टॅपिंग करावे लागते. साल काढल्यानंतर दोन ते तीन तास चीक गळून करवंटीत जमा होतो.

- 02358 - 282717
वनशास्त्र महाविद्यालय, दापोली

No comments:

Post a Comment