Tuesday, February 8, 2011

आमच्याही कुटुंबाचा वार्षिक ताळेबंद आहे

बारा जणांचं आमचं कुटुंब आहे. आई-वडील आम्ही नवरा-बायको, दोन भाऊ, शंभरी गाठलेली आजी, मला दोन मुलं आहेत, एक मुलगी आहे. एक मुलगा आहे. एका भावाचं नुकतंच लग्न झालं आहे. तीन नंबर भाऊ शिकतो आहे, दोन म्हशी आहेत, एक गाय आहे, एक बैलजोडी आहे. पाच शेळ्या आहेत, सुगीत आमचं कुटुंब शेतावरच वस्तीला असतं. वस्तीपुरतं शेतावर झोपडीवजा घर आहे. गावातल्या घरी आजी एकटी राहते, तिच्याबरोबर माझी शाळेत शिकणारी पोरं असतात. आजीला पोरांखेरीज करमत नाही. आम्ही दररोज गावातील घराकडे येत- जात असतो. मोटरसायकल आहे. दोन न ंबरचा भाऊ मोटरसायकल वरून भाजीपाला रोज बाजारात घेऊन जातो. तीन भावांत चार एकर शेती आहे. विहीर आहे. विहिरीला भरपूर पाणी आहे. माझे एक चुलते आहेत. चुलत चुलते. माझ्या वडिलांना सख्खा भाऊ नाही. चुलत चुलत्याची तेरा एकर शेती आहे. ती भागाने आम्हीच कसतो. त्याला मूलबाळ नाही. त्यांचा सांभाळ आम्हीच करतो. त्याचे वडील लहानपणी वारले त्याचा सांभाळ आमच्या आजीनेच केला. त्यामुळे आजीवर त्याची फार मर्जी आहे. अजून काहीही करायचं असेल तर तो आजीला विचारतो. तो शिकला आहे. काही वर्षे तलाठी होता. राजकारणाचा त्याला नाद आहे. पक्षाचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी नोकरी सोडली. त्याची राहणी फारच साधी आहे. गरजा फारच कमी आहेत. त्यानं गरिबांच्या कल्याणासाठी सगळं आयुष्य वेचलं. त्याने पक्षाकडून कधीच मानधन घेतलं नाही. तो सांगतो. वडिलोपार्जित शेतीवाडी आहे. जगण्यापुरतं मिळतं. अनेकांना त्याने मदतही केली आहे. त्याने मला सांगितले आहे. माझ्या माघारी माझ्या उत्पन्नातील काही भाग गोरगरिबांना मदत करा. त्याच्या शेतीचा आम्हाला मोठा आधार आहे. त्याने आम्हाला एक शिकवलं आहे. सगळा खर्च रोजच्या रोज लिहून ठेवायचा. दोन नंबरचा भाऊ घरातील सगळा खर्च लिहून ठेवतो. त्यानं दुसरं एक शिकवलं. आपला वार्षिक ताळेबंद तयार करायचा. याचा अर्थ आम्ह
ाला कळायचा नाही. तो सांगतो. राष्ट्र जसं आपला अर्थ संकल्प तयार करतं, तसा आपलाही अर्थसं कल्प तयार केला पाहिजे. भविष्यात काय करणार आहोत, त्याची तरतूद कशी करायची. तातडीची गरज कोणती? ऐनवेळी येणाऱ्या संकटासाठी तरतूद केली पाहिजे. आपण शेतकरी भरपूर राबतो. राबूनही आपल्या पदरी काही पडत नाही. भूमी तर दरवर्षी देत आहे. तिचा काही दोष नाही. आपल्या जिवावर, आपल्या कष्टावर दुसरे गब्बर झाले. ते गब्बर का झाले, त्यांनी हिशेब ठेवला. नफा-तोटा त्यांना रोज कळतो. आपण कुठे आहेत हे कळावं लागतं. त्यानतर कुठे जायचं हा विचार सुचतो. आपण हिशेबी नाही. आपल्याकडे कोणताच ताळेबंद नाही. आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं. अशी आपल्या शेतकरी समाजाची गत आहे. आपली जी आजची परिस्थिती आहे. त्या विषयी इतरही घटक जबाबदार आहेत. त्यामध्ये आपणही जबाबदार आहोत, आपला शेतकरी शिक्षित झाला पाहिजे. तो साक्षर झाला पाहिजे. आपली उन्नती आपण करू शकतो, निसर्गाची आपल्याला साथ आहे. ज्या देशांना निसर्गाची साथ नाही. ते पाणीही आयात करतात, ती राष्ट्रे पुढे जात आहेत. शेती कसणे हे कमीपणाचं आहे, हा एक गैरसमज पसरला आहे. तो गैरसमज पसरायला आपणच जबाबदार आहोत, निसर्गाचा एक नियम आहे. निसर्गाने सर्वांना जगता येईल, एवढं दिलं आहे. भेदाभेद आपण केला आहे. निसर्गाने प्रत्येक जिवाला जन्म दिला. त्याला कोणती ना कोणती कला दिली आहे. आं धळे, पांगळेही याला अपवाद नाहीत. आमची मिळकत, आमचा खर्च याचा ताळेबंद तयार करतो. दरवर्षी प्रगती होत आहे. गावातील इतर कुटुंबांत असं घडत नाही. याचं कारण त्यांनी नियोजन केले नाही. एक खरं आहे. प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शकाची गरज आहे. पंतप्रधान जरी असला तरी त्याला अनेक लोक सल्ला देण्यासाठी असतात. आ मच्या चुलत भावाने केवळ शेती दिली नाही, त्याने कसं जगावं हेही शिकवलं हे अधिक महत्त्वाचं आहे, प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून काम करावे, हे सूत्र आहे. अडीअडचणीला एकमेकांचा हात द्यावा, माणूस कितीही मोठा होऊ द्या. त्याला इतरांची गरज भासते, आम्हाला कुणाची गरज नाही, ही भावना फसवी आहे.

No comments:

Post a Comment