Tuesday, February 8, 2011

आमच्याही कुटुंबाचा वार्षिक ताळेबंद आहे

बारा जणांचं आमचं कुटुंब आहे. आई-वडील आम्ही नवरा-बायको, दोन भाऊ, शंभरी गाठलेली आजी, मला दोन मुलं आहेत, एक मुलगी आहे. एक मुलगा आहे. एका भावाचं नुकतंच लग्न झालं आहे. तीन नंबर भाऊ शिकतो आहे, दोन म्हशी आहेत, एक गाय आहे, एक बैलजोडी आहे. पाच शेळ्या आहेत, सुगीत आमचं कुटुंब शेतावरच वस्तीला असतं. वस्तीपुरतं शेतावर झोपडीवजा घर आहे. गावातल्या घरी आजी एकटी राहते, तिच्याबरोबर माझी शाळेत शिकणारी पोरं असतात. आजीला पोरांखेरीज करमत नाही. आम्ही दररोज गावातील घराकडे येत- जात असतो. मोटरसायकल आहे. दोन न ंबरचा भाऊ मोटरसायकल वरून भाजीपाला रोज बाजारात घेऊन जातो. तीन भावांत चार एकर शेती आहे. विहीर आहे. विहिरीला भरपूर पाणी आहे. माझे एक चुलते आहेत. चुलत चुलते. माझ्या वडिलांना सख्खा भाऊ नाही. चुलत चुलत्याची तेरा एकर शेती आहे. ती भागाने आम्हीच कसतो. त्याला मूलबाळ नाही. त्यांचा सांभाळ आम्हीच करतो. त्याचे वडील लहानपणी वारले त्याचा सांभाळ आमच्या आजीनेच केला. त्यामुळे आजीवर त्याची फार मर्जी आहे. अजून काहीही करायचं असेल तर तो आजीला विचारतो. तो शिकला आहे. काही वर्षे तलाठी होता. राजकारणाचा त्याला नाद आहे. पक्षाचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी नोकरी सोडली. त्याची राहणी फारच साधी आहे. गरजा फारच कमी आहेत. त्यानं गरिबांच्या कल्याणासाठी सगळं आयुष्य वेचलं. त्याने पक्षाकडून कधीच मानधन घेतलं नाही. तो सांगतो. वडिलोपार्जित शेतीवाडी आहे. जगण्यापुरतं मिळतं. अनेकांना त्याने मदतही केली आहे. त्याने मला सांगितले आहे. माझ्या माघारी माझ्या उत्पन्नातील काही भाग गोरगरिबांना मदत करा. त्याच्या शेतीचा आम्हाला मोठा आधार आहे. त्याने आम्हाला एक शिकवलं आहे. सगळा खर्च रोजच्या रोज लिहून ठेवायचा. दोन नंबरचा भाऊ घरातील सगळा खर्च लिहून ठेवतो. त्यानं दुसरं एक शिकवलं. आपला वार्षिक ताळेबंद तयार करायचा. याचा अर्थ आम्ह
ाला कळायचा नाही. तो सांगतो. राष्ट्र जसं आपला अर्थ संकल्प तयार करतं, तसा आपलाही अर्थसं कल्प तयार केला पाहिजे. भविष्यात काय करणार आहोत, त्याची तरतूद कशी करायची. तातडीची गरज कोणती? ऐनवेळी येणाऱ्या संकटासाठी तरतूद केली पाहिजे. आपण शेतकरी भरपूर राबतो. राबूनही आपल्या पदरी काही पडत नाही. भूमी तर दरवर्षी देत आहे. तिचा काही दोष नाही. आपल्या जिवावर, आपल्या कष्टावर दुसरे गब्बर झाले. ते गब्बर का झाले, त्यांनी हिशेब ठेवला. नफा-तोटा त्यांना रोज कळतो. आपण कुठे आहेत हे कळावं लागतं. त्यानतर कुठे जायचं हा विचार सुचतो. आपण हिशेबी नाही. आपल्याकडे कोणताच ताळेबंद नाही. आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं. अशी आपल्या शेतकरी समाजाची गत आहे. आपली जी आजची परिस्थिती आहे. त्या विषयी इतरही घटक जबाबदार आहेत. त्यामध्ये आपणही जबाबदार आहोत, आपला शेतकरी शिक्षित झाला पाहिजे. तो साक्षर झाला पाहिजे. आपली उन्नती आपण करू शकतो, निसर्गाची आपल्याला साथ आहे. ज्या देशांना निसर्गाची साथ नाही. ते पाणीही आयात करतात, ती राष्ट्रे पुढे जात आहेत. शेती कसणे हे कमीपणाचं आहे, हा एक गैरसमज पसरला आहे. तो गैरसमज पसरायला आपणच जबाबदार आहोत, निसर्गाचा एक नियम आहे. निसर्गाने सर्वांना जगता येईल, एवढं दिलं आहे. भेदाभेद आपण केला आहे. निसर्गाने प्रत्येक जिवाला जन्म दिला. त्याला कोणती ना कोणती कला दिली आहे. आं धळे, पांगळेही याला अपवाद नाहीत. आमची मिळकत, आमचा खर्च याचा ताळेबंद तयार करतो. दरवर्षी प्रगती होत आहे. गावातील इतर कुटुंबांत असं घडत नाही. याचं कारण त्यांनी नियोजन केले नाही. एक खरं आहे. प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शकाची गरज आहे. पंतप्रधान जरी असला तरी त्याला अनेक लोक सल्ला देण्यासाठी असतात. आ मच्या चुलत भावाने केवळ शेती दिली नाही, त्याने कसं जगावं हेही शिकवलं हे अधिक महत्त्वाचं आहे, प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून काम करावे, हे सूत्र आहे. अडीअडचणीला एकमेकांचा हात द्यावा, माणूस कितीही मोठा होऊ द्या. त्याला इतरांची गरज भासते, आम्हाला कुणाची गरज नाही, ही भावना फसवी आहे.

बांबू लागवड यशस्वी होण्यासाठी...

शेत व पडीक जमिनीवरही बांबू लागवड यशस्वीपणे करता येते. त्यासाठी लागवडीच्या पद्धती, पीक संरक्षण आणि बांबू कापणी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. याविषयीची माहिती करून घेतल्यास बांबूपासून चांगले उत्पादन मिळविता येईल.

बांबूच्या लागवडीसाठी किमान नऊ अंश से. तापमानाची आवश्‍यकता असते. बांबूच्या व्यावसायिक पद्धतीने लागवडीसाठी साधारणतः खोल गाळाची व पाण्याचा निचरा होणारी जमीन उपयुक्त असल्याचे आढळून आलेले आहे. बांबू लागवडीच्या दोन पद्धती आहेत : १) कंद काढून लागवड करणे. २) बियांपासून रोपे तयार करून लागवड करणे. याशिवाय उतिसंवर्धन पद्धतीने बांबूची अभिवृद्धी यशस्वी ठरलेली आहे.

कंदाद्वारे लागवड ः
बांबूच्या वाढणाऱ्या खोडास कंद असे म्हणतात. एक वर्षाच्या आतील दोन-तीन बांबू काढून लागवडीच्या ठिकाणी जमिनीत गाडून लावावे. जमिनीच्या वर १०-१२ सें.मी. बांबू ठेवून त्यावरील भाग छाटावा. किमान दोन-तीन डोळे असणारा कंद लागवडीकरिता वापरावा.

बियांपासून बांबूची लागवड ः
रोपवाटिकेत पिशव्यांमध्ये किंवा गादी वाफ्यावर रोप तयार करून लागवडीसाठी वापरता येतात. पेरणीसाठी बियाण्याला कुठल्याही प्रकारची पूर्वप्रक्रिया करण्याची आवश्‍यकता नसते; परंतु उधईपासून बियाण्याचे संरक्षण करण्यासाठी पेरणी करताना गादी वाफ्यावर दहा टक्के लिंडेन पावडर शिंपडावी. पेरणीनंतर दहा दिवसांत बियाण्याची उगवण होते. नवीन बियाण्याची उगवणक्षमता ७० टक्‍क्‍यांपर्यंत असते. डब्यात बियाण्याची साठवण केल्यास आठ ते दहा महिन्यांपर्यंत बियाणे पेरणीसाठी वापरता येते.

पेरणीची वेळ ः
ज्या ठिकाणी पेरणीसाठी बियाणे उपलब्ध आहे, अशा ठिकाणी मार्च, एप्रिल महिन्यांत पेरणी करावी. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी ३०० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीत लागवड करावयाची असल्यास त्या ठिकाणी उन्हाळ्यात पाच मीटर अंतरावर आखणी करून ६० ु ६० ु ६० सें.मी. आकाराचे खड्डे खोदून ठेवावे. पावसाळ्याच्या सुरवातीस भुसभुशीत माती व एक आगपेटी भरून दहा टक्के लिंडेन पावडर टाकून खड्डा भरून घ्यावा. पावसाला सुरवात झाली म्हणून पिशवीतील रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून खड्ड्यात लागवड करावी.

बांबू बेटाची जोपासना व मशागत ः
लागवड झाल्यावर प्रथम वर्षी महिन्यातून एकदा नियमितपणे रोपाभोवतीचे तण काढून माती हलवून घ्यावी आणि रोपांना मातीची भर द्यावी. यामुळे कंद जोमाने वाढण्यास मदत होते. निंदणी आणि भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे. कंदापासून लागवड केल्यास बांबूचे बेट दुसऱ्याच वर्षी तयार होते व पाच-सहा वर्षांत उत्पादनास सुरवात होते. बांबू जमिनीतल्या मूळ खोडापासून वाढतात. त्यामुळे खोडापासून प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नवीन कोंब फुटतात. ज्या दिशेस कोंब फुटतात, त्याला "चाल' म्हणतात. बांबू बेटातील कळकांची वाढ झपाट्याने होते आणि ती एका वर्षात पूर्ण होते. मुली जातीचा बांबू सोडल्यास सर्व बांबूच्या जाती एकत्र बेट किंवा रांजी बनवून वाढतात. बांबूच्या बेटाचे आयुष्य ३० ते ६० वर्षांपर्यंत असते. आयुष्याच्या संपुष्टीनंतर बांबूस फुले येतात. अशा वेळेस बांबू वनातील सर्व बांस वाळतात व मरतात. बियांपासून नवीन रोपे तयार होतात व बांबू वनाचे पुनरुज्जीवन होते. दर वर्षी येणारे नवीन कोंब जतन करून त्यांना वाढायला आधार आणि वाव देऊन फक्त पक्के असे कळक ठराविक पद्धतीने तोडल्यास व मूळ खोडास कोणतीही इजा न पोचविल्यास बांबूच्या बेटापासून त्याच्या स्वाभाविक आयुष्यमानापर्यंत सातत्याने उत्पादन मिळू शकते.
०७१२-२५२१२७६
अखिल भारतीय समन्वित कृषी वनशेती संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर.


बांबू कापणीबाबत नियम ः
१) अविकसित रांजीतून बांबू तोडू नये. ज्या रांजीत दहापेक्षा कमी कळक असतात, त्यांस अविकसित रांजी समजतात. २) वाढीच्या काळात १५ जून ते १५ सप्टेंबरपर्यंत बांबूची कापणी करू नये. ३) दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे बांबू तोडू नयेत. ४) अर्धवट तुटलेले, वेडेवाकडे, मेलेले कळक प्रथम तोडावे. ५) प्रत्येक नवीन कळक आणि कोवळ्या कळकांना आधार देण्यासाठी आणि भविष्य काळाच्या दृष्टीने प्रत्येक कोवळ्या कळकासाठी दोन या प्रमाणात कमीत कमी आठ प्रौढ कळक प्रत्येक रांजीत सोडलेच पाहिजेत. मूळ खोड उघडे पडू नये किंवा त्यास कुठलीही इजा पोचू नये, यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : १) रांजीत राखून ठेवलेले कळक हे रांजीत सारख्या अंतरावर राहतील, या दृष्टीने तोड केली पाहिजे. २) कळकांच्या जमिनी लगतच्या पहिल्या कांड्यावर व जमिनीपासून १५ सें.मी. उंचीवर आणि जास्तीत जास्त ४५ सें.मी. उंचीपर्यंत कळक तोडला पाहिजे. ३) तोड ही अत्यंत तीक्ष्ण धारेच्या पात्याने केली पाहिजे. त्याकरिता विशेष प्रकारे तयार केलेले बांबू कापणी विळे वापरावेत. ४) तोडीनंतर सर्व काडीकचरा रांजीपासून दूर केलाच पाहिजे. त्यामुळे कीटक व वणव्यापासून बांबूवनास धोका राहणार नाही.

उत्तम पोषणासाठी दररोज खा अंडे...

अंडे व अंड्याचे पदार्थ हे आरोग्य संवर्धन व रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यास उपयोगी आहेत. अंडे खाल्ल्यामुळे फक्त आरोग्य सं वर्धनच होते असे नाही तर एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या लोकांमध्ये जर विशेष पोषण तत्त्वाची कमतरता आढळली तर त्या तत्त्वाचे प्रमाण कोंबडीच्या खाद्यात वाढवून दिल्यास मिळणाऱ्या अंड्यांपासून त्या माणसांमधील पोषण तत्त्वाची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
डॉ. आर. एन. वाघमारे, डॉ. सी. एस. शेख

वैज्ञानिकांनी कोलेस्टेरॉलची भीती काढून टाकल्यामुळे बाजारात अंडे व अंड्यांच्या पदार्थांना चांगली मागणी मिळू लागली आहे. अनेक देशांतील आरोग्य संवर्धन करणाऱ्या संस्थांनी प्रत्येक दिवशी एक अंडे खावे असा सल्ला दिला आहे.

उच्चतम दर्जाचे प्रोटिन (प्रथिनयुक्त पदार्थ)
इतर कोणत्याही पदार्थांपेक्षा अंड्यातील प्रथिने (प्रोटिन) हे जास्त प्र माणात व उच्चतम दर्जाचे आहेत आणि ते ऊर्जा व वजन नियंत्रण करण्यास उपयोगी पडतात. त्यांची एक विशेषतः अशी आहे, की हे वृद्धांसाठी पचनास अति सोपे आहे, कारण की वयोमानानुसार होणाऱ्या स्नायूंतील (सारकोपेनिया) या आजाराचे घातक परिणाम ते कमी करते. गरोदर स्त्रियांसाठी अंडे हे किमती, परवडण्यायोग्य उच्चतम दर्जाच्या प्रथिनांचे (प्रोटिन) स्रोत आहे. यात अर्भकाची संपूर्ण वाढ व विकास होण्यास लागणारे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. तसेच गर्भावस्थेत अंडे खाल्ल्यामुळे सरासरी वजनाचे बालक जन्‌ माला येण्यास मदत होते. (कमी वजनाचे बालक जन्मास येत नाही.) अंड्यातील झानतोफील, ल्युटीन आणि झानथिन हे डोळ्यांचे आरोग्य राखतात, तसेच स्नायूच्या सुरकुत्या, आंधळेपणा व मोतीबिंदू कमी करण्यास मदत करते. अंड्यातील ल्युटीन हे दुसऱ्या पदार्थांपासून मिळणाऱ्या ल्युटीनपेक्षा दोन ते तीन टक्के जास्त आहे. कारण ल्युटीनची विरघळण्याची क्षमता ही अंड्यातील पिवळ्या लेसिथिनमध्ये सर्वाधिक आहे. आठवड्यास सहा अंडी खाल्ल्यामुळे रक्तातील झानतोफीलचे प्रमाण तर वाढतेच, शिवाय स्नायूंतील झानतोफील पिगमेंट ही 50 टक्केपर्यंत वाढते. मॅरीगोल्डचा रस कोंबडीच्या खाद्यात मिसळल्यास अंड्यातील ल्युटीन व झानतीनचे प्रमाण हे पाच ते दहा टक्के वाढते. झानतीनचे प्रमाण जास्त असलेली अंडी सध्या मर्यादित प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत.

"ड' जीवनसत्त्व
पुष्कळ लोकांत "ड' जीवनसत्त्व कमतरता असल्याचे आढळून येते. बालकातील "ड' जीवनसत्त्वाची कमतरता 80 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. तर 20 वर्षांच्या आतील वयोगटात ती 42 टक्के पर्यंत आहे. "ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे 26 टक्‍क्‍यांहून अधिक पुरुष व महिला मृत्यूस कारणीभूत ठरतात. अमेरिकेतील एका अभ्यासात 99,745 जणांची आरोग्य तपासणी केली असता त्यात असे आढळले, की "ड' जीवनसत्त्व व जीर्ण (क्रॉनिक) आजाराचा संबंध आढळला आहे. त्यापैकी 33 टक्के हृदयविकाराच्या रोग्यांची संख्या आहे. मधुमेह प्रकार-2 ची 55 टक्के आणि पचन संस्थेशी संलग्न विकारांची संख्या 51 टक्के आहे. कोंबडीच्या खाद्यात (पशू खाद्यात) बदल करून अं ड्यातील "ड' जीवनसत्त्वाचे प्रमाण नैसर्गिकरीत्या तीन ते पाच पट वाढवता येते.

आहारात अंडी उत्तमच
बहुतेक प्रौढ तसेच गरोदर व बाळास दूध पाजणाऱ्या स्त्रियांत को लिनचे प्रमाण कमी आढळते. सर्वाधिक कोलिनचे प्रमाण हे म्हशीचे मा ंस, कोंबडीचे यकृत व अंडे यात आहे. आहारातील अंड्याच्या स मावेशामुळे प्रौढातील कोलिनचे प्रमाण 25 ते 30 टक्के व गरोदर स्त्रियांत 50 टक्केपर्यंत वाढण्यास मदत होते.

अंड्याचे पदार्थ
अंड्याच्या पदार्थांत फक्त पोषण तत्त्वच वाढवायचे नसून त्यात काही खास पोषण घटकही मिसळता येतात. उदा. पातळ अंड्याच्या पदार्थांत डी एच.ए. ल्युटीन, जीवनसत्त्व बी-12, जीवनसत्त्व "ड' व अंड्यातील पांढऱ्या बल्कात प्रोटिन (पिष्टमय पदार्थ) मिसळल्यास ते आहारातील गरज भागविण्यास पुरेसे आहेत. अशाच प्रकारचे पदार्थ हे गरोदर महिला, बाळास दूध पाजणाऱ्या स्त्रिया, वाढणारी बालके, खेळाडू व शरीर सौष्ठव करणाऱ्यांसाठी बनवू शकतो. अंडे हे शरीरास हवे असणारे अन्न घटक इतर कोणत्याही स्रोतांपेक्षा सहज उपलब्ध करून देते.
02452-243375,228176
(लेखक पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य व साथरोग विज्ञान विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत.)

अंड्यातील कोलिनचे फायदे
कोलिन हे अंड्यातील अतिमहत्त्वाचे पोषणतत्त्व आहे. अंडे हे को लिनचे उत्तम स्रोत आहे. कोलिन हे मेंदू व मज्जातंतूचे कार्य, यकृतातील चयापचय, पोषण तत्त्वाचे वहन तसेच शरीरातील प्रत्येक पेशीच्या कार्यात उपयोगी आहे. कोलिन हे बालकाच्या मेंदूची वाढ व विकास तसेच स्मरणशक्ती व शिक्षणास उपयुक्त आहे. त्याचे इतर फ ायदे पुढीलप्रमाणे आहेत.
- स्मरणशक्ती वाढविते : गरोदर मातेच्या आहारात कोलिनचे योग्य प्रमाण असले तर नवजात शिशूची स्मरणशक्ती मजबूत राहते.
- स्तनाचा कर्करोग टळतो : योग्य प्रमाणात कोलिन आहारात असेल तर स्तनाचा कर्करोग होत नाही.
- हृदयविकारास प्रतिबंध : कोलिन हे रक्तातील हिमोस्सिटीनचे प्रमाण कमी करण्यास तसेच हृदयविकार कमी करण्यास मदत करते.

परसबागेत करा औषधी वनस्पतींची लागवड

अनादिकाळापासून मानव आपल्या आरोग्य संतुलनासाठी औषधी वनस्पतींचा वापर करत आला आहे. निसर्गशास्त्र आणि आयुर्वेदाच्या काही सिद्धांतानुसार मनुष्य प्राण्यास होणाऱ्या व्याधी अथवा रोग स्थानानुसार बदलत असतात. अशा या रोगांवर वापरल्या जाणाऱ्या वनस्पती त्या-त्या परिसरात उपलब्ध असतात; मात्र बऱ्याचशा वनस्पती वाढती लोकसंख्या, जंगलतोड आणि अशा कितीतरी कारणांमुळे नष्ट होत आहेत. अशा या वनस्पतींचा आरोग्य संतुलनासाठी वापर व्हावा यासाठी त्यांची आपल्या परसबागेत कमी जागेत, कमी पाण्यात लागवड करता येऊ शकते.
- डॉ. दिगंबर मोकाट

तमिळनाडू, केरळ राज्यांत परसबागेतून सहकारी पद्धतीवर आधारित औषधी आणि सुगंधी वनस्पतींची शेती केली जाते. अशा पद्धतीची "परसबाग शेती' आपल्याकडेही होऊ शकते. परसबागेमध्ये होऊ शकणाऱ्या काही औषधी आणि सुगंधी वनस्पतींची माहिती घेऊ या.

कोरफड - कुमारी, कुवारकांड या नावाने ही वनस्पती सर्वपरिचित आहे. घरगुती उपायांमध्ये डोळ्यांच्या विकारावर कोरफडीच्या रसाची पट्टी डोळ्यांवर ठेवतात. भाजल्यावर होणारी आग कमी करण्यासाठी याच्या रसाची पट्टी भाजलेल्या भागावर ठेवतात. खोकल्यावर - कोरफडीचा गर मधातून देतात. या वनस्पतीची लागवड फुटव्यापासून 60 ु 60 सें.मी. अंतराने गादीवाफ्यावर करावी.

गवती चहा - वातविकारात याचे तेल अंगास चोळल्याने ठणका कमी होतो. सर्दी-पडशावर गवती चहा, आले, तुळस व पुदिना यांचा काढा देतात. रेताड लालसर जमिनीत गवती चहा चांगला वाढतो. 90 सें.मी. अंतराने सऱ्या पाडून 60 सें.मी. अंतराने बियांपासून अथवा ठोंबापासून लागवड करावी.

गुळवेल - काविळीवर गुळवेलीचा रस मधात घालून देतात. जुलाब, पोटातील मुरडा, हगवण, कृमी या विकारात या वनस्पतीचा वापर करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, संधिवात, मधुमेहात या वनस्पतीच्या खोडाचा वापर करतात. लागवड वेलीच्या छाट कलमाद्वारे करावी. कुंपणाच्या बाजूने किंवा मोठ्या झाडांच्या शेजारी लागवड करता येते.

चित्रक - चित्रक अग्निसारखा गरम म्हणजेच अतिविषारी आहे. पोटात देताना त्यासोबत नागरमोथा, वावडिंग यासारखी थंड औषधे द्यावीत. खरूज व चामड्याचे रोग यांवर चित्रकमूळ दूध व मीठ याच्या मलमाने जुने रोग जातात. मूळव्याधीवर चित्रकाची साल, टाकणखार, हळद आणि गूळ समभाग घेऊन वाढून मोडावर लेप करावा. कोकणात सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात ही वनस्पती आढळते. परसबागेत लावताना छाट कलमाद्वारे किंवा रोपाद्वारे 2 ु 2 मीटर अंतराने 30 ु 30 ु 30 सें.मी.च्या खड्ड्यात परसबागेच्या कोपऱ्यात लागवड करावी.

वाळा - या गवतास शीतसुगंधी किंवा खस असे म्हटले जाते. मुळाचे चूर्ण थंड उत्तेजक आणि मूत्रल आहे. चूर्ण अंगाला चोळले तर थंडपणा येतो. वाळा सरबत, वाळा अत्तर आणि थंडाव्यासाठी पंखे तयार करण्यासाठी उपयोगी पडते. कोकण विभागात हे गवत चांगले वाढते. लागवड ठोंबापासून 2 ु 2 फूट अंतराने माहे जून-जुलै महिन्यांत सऱ्या पाडून एका रांगेत करावी.

शतावरी - शतावरीची मुळे औषधात वापरतात. मुळाची पावडर मूत्राशयाचे रोग, सफेद प्रदर आणि शुक्राणू वाढीसाठी उपयुक्त असते. शतावरी दूधवाढीसाठी अति उत्तम समजली जाते. तसेच ती मधुर, शीत, कडू, अग्निदीपक व बलकारक आहे. शतावरीची लागवड ओळीने 1 ु 1 मी. अंतराने सऱ्या पाडून करावी. लागवड बियांपासून रोपे करून किंवा कंदाने करता येते.

कोष्ठ - याचे चूर्ण गरम पाण्यात भिजवून डोक्‍यास लावावे. केस स्वच्छ होतात. खरूज, गजकर्ण यावर याचे चूर्ण तेलात मिसळून लावावे. कोष्ठ पावडर मधात दिल्यास ताप, खोकला, दमा यावर फायदा होतो.

ब्राह्मी - ब्राह्मी रस आणि त्याच्या दहापट तेल एकत्र करून सिद्ध केलेले तेल डोक्‍यास लावण्यासाठी श्रेष्ठ आहे. यामुळे मेंदू थंड राहतो. स्मृती वाढते व केसांची वाढ चांगली होते. पानाचे पोटीस कफ पातळ होण्याकरिता उपयुक्त आहे. फुटव्यापासून लागवड केली जाते. या वनस्पतीस पाणथळ जमीन चांगली मानवते.

माका - केस काळे होण्यासाठी आणि वाढविण्यासाठी ब्राह्मी, माक्‍याचा रस आणि तिळाचे तेल उकळून सिद्ध केलेले तेल रोज डोक्‍यास लावतात. काविळीवर - माक्‍याचा रस, मिरेपूड घालून देतात. भाजलेल्यावर माका व काळी तुळस यांच्या पाल्याचा रस काढून लावावा. कफ-वात कमी करण्यासाठी, कातडीच्या रोगावर, सुजेवर, रक्तप्रवाह या विकारावर या वनस्पतींचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. बियांपासून लागवड 45 ु 30 सें.मी. अंतराने गादी वाफ्यावर करावी.

सदाफुली - मूत्रविकार, हगवण थांबविणे, पांढऱ्यापेशी वाढविणे, जखम बरी करणे, मधुमेह, कर्करोग इत्यादी विकारांत ही वनस्पती वापरली जाते. कॅन्सरमध्ये यांच्या मुळांचा आणि पानांचा उपयोग करतात. मधुमेह, वाढलेले ब्लडप्रेशर व हृदयरोग यावर याची पाने रात्री पाण्यात भिजत ठेवावी व 12 तासांनी ते पाणी पितात. परसबागेत रोपापासून 45 ु 30 सें.मी. अंतराने लागवड करावी. लागवड जून-जुलै महिन्यांत करावी.

सर्पगंधा - 30 प्रकारचे रासायनिक घटक या वनस्पतीत आढळतात. रक्तदाब कमी करण्यासाठी सर्पगंधा फार प्रसिद्ध आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होतात. अभिवृद्धी बियांपासून, खोडापासून किंवा मुळांपासून करता येते. लागवड 30 ु 30 सें.मी. अंतरावर करावी.

अडुळसा - वॅसिसीन हे रासायनिक गुणद्रव्य या वनस्पतीत असते. त्यामुळे खोकला, घशाचे आजार, कफाचा विकार, दमा या रोगांवर रामबाण म्हणून समजले जाते. तसेच संधिवात, गुडघेदुखी यावरही ही वनस्पती वापरतात. कलमाद्वारे परसबागेच्या कुंपणासाठी लागवड करावी. कलमाद्वारे 1 ु 1 मी. अंतरावर लागवड पावसाळ्यामध्ये करावी.

तुळस - आपल्याकडे तुळशीच्या विविध प्रजाती आहेत. त्यामध्ये श्‍वेत तुळस, सब्जा, रानतुळस, तापमारी तुळस, मुत्री तुळस, माळी तुळस, अजगंधा तुळस यांचा समावेश होतो. कफाच्या तापावर - तुळशीचा रस देतात. उचकीवर तुळशीचा रस थोडा मध घालून देतात. पोटदुखीवर - तुळशीचा रस थोडा लिंबाचा रस घालून घेतात. दम्यावर - तुळशीचा रस खडीसाखरेची पूड किंवा मध घालून घेतात. कोरड्या खोकल्यातही तुळशीचा रस आल्याच्या रसातून घेतात. बियांद्वारे किंवा रोपांपासून लागवड 50 ु 30 सें.मी. अंतराने करावी.

निर्गुंडी - निर्गुंडीचा पाला ऊन करून सुजेवर बांधावा. शक्ती येण्यासाठी निर्गुंडीच्या मुळीचा दुधात काढा करून घेतात. वातव्याधीवर निर्गुंडीचा पाला पाण्यात टाकून उकडावा. त्याच्या वाफेवर मिठाची पुरचुंडी गरम करून शेक देतात. सर्दी-पडसे, सांधेदुखी यावर निर्गुंडीचा पाला उपयुक्त आहे. मुरगळण्यावर याच्या पाल्याचे आणि तांबट मातीने शेकतात आणि लेप देतात. या वनस्पतीची लागवड परसबागेच्या कुंपणाला करावी. खोडाच्या कलमाने 1 ु 1 मीटर अंतराने जून-जुलै महिन्यांत करावी.

वेखंड - भूक लागत नसल्यास - वेखंडाची पूड मधातून देतात. लघवी साफ होण्यासाठी - वेखंडाची पूड दूध-साखरेबरोबर द्यावी. बुद्धी वाढविण्यासाठी, तापावर आणि व्रण किंवा जखम भरून येण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. उत्तम निचरा होणारी जमीन या वनस्पतीस चांगली मानवते. 30 ु 30 सें.मी. अंतरावर कंदाने लागवड करावी.

मेंदी - या वनस्पतीची परसबागेच्या कुंपणासाठी लागवड करतात. या वनस्पतींची लागवड बियांद्वारे किंवा छाट कलमांद्वारे केली जाते. लागवड 30 ु 30 सें.मी. अंतराने पावसाळ्यात करावी. या वनस्पतीच्या सालीचा आणि पानांचा उपयोग काविळीवर केला जातो. तसेच साल वाटून जुनाट चामडी रोगावर देतात. संधिवातामध्ये मेंदीची पाने बारीक वाटून त्याचा लेप सांध्यावर लावतात.

जास्वंद - जास्वंदीची फुले आणि मूळ गर्भातील अडचणी, वीर्यातील व्याधी, पोटातील कृमी, स्त्री-पुरुष जननेंद्रियांची व्याधी यावर फार उपयुक्त आहे. तुपात तळलेल्या कळ्या स्त्रियांचा अधिक मासिक स्रावांवर नियंत्रण ठेवते. फुले बलवर्धक, बुद्धिवर्धक, रक्तस्तंभन करणारी आहे. जास्वंद जेलीचा केसांच्या संबंधित तक्रारीवर वापर केला जातो. लागवड छाट कलमाने 2 ु 2 मीटर अंतराने लागवड करावी.

पिंपळी - या वेलीची फळे आणि मुळ्या औषधासाठी वापरतात. पिंपळीचा अर्क उत्तेजक, वायुसारक, स्वास्थ्यकारी, शक्तिवर्धक, कामोत्तेजक, कृमिनाशक व गर्भाशय स्राव रोधक आहे. खोकला आणि दमा या विकारावर अतिशय गुणकारी आहे. चूर्ण मधात मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. या वनस्पतीची लागवड छाट कलमाद्वारे केली जाते. 30 सें.मी. लांबीचे छाट वापरून 30 ु 30 सें.मी. अंतरावर पावसाळ्याचे सुरवातीस लागवड करावी.

कडुनिंब - या वनस्पतींचे सर्व भाग औषधांमध्ये वापरले जातात. खोडाची साल कृमिनाशक आहे. कातडीच्या रोगावर पानांच्या रसाचा वापर करतात. दंतविकार, हिरड्यामधून पू येणे, वास येणे, श्‍वासाची दुर्गंधी या व्याधी बऱ्या करण्यासाठी या वनस्पतींचा वापर केला जातो. ही वनस्पती वृक्षवर्गीय असल्याने परसबागेत कुंपणाच्या बाजूने लागवड करावी. या वनस्पतीस पाणी खूप कमी लागते. त्यामुळे पावसाळ्यात निचरा होईल, असे पाहावे. लागवड 1 ु 1 ु 1 फुटाचे खड्डे करून रोपापासून 7 ु 7 मी. अंतरावर करावी.

आवळा - "क' जीवनसत्त्वाने परिपूर्ण असलेल्या या वनस्पतीच्या फळांचा उपयोग मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक औषधात केला जातो. ताप, कावीळ, आम्लपित्त, हगवण, मधुमेह या विकारांवर आवळा उपयुक्त आहे. आयुर्मान वाढविण्यासाठी या वनस्पतींची फळे खावीत. लागवड रोपापासून अथवा कलमाद्वारे होते. कांचन, बनारसी, एनए-7, एनए-10, कृष्णा या आवळ्याच्या जातींची लागवड 5 ु 5 मीटर अंतरावर 1 ु 1 ु 1 फूट आकाराचे खड्डे घेऊन करावी.

- 02358-282717
औषधी वनस्पती माहिती केंद्र, वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी

जॅमचे प्रमाणीकरण

स्क्वॅश, नेक्‍टर सिरप या पदार्थांप्रमाणेच जॅम तयार करतानासुद्धा विविध घटक पदार्थ प्रमाणीकरणानुसार घ्यावे लागतात. जॅम एका फळाच्या गरापासून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फळांपासून मिक्‍स फ्रूट जॅम तयार करता येतो. फळांचा गर, साखर, पेक्‍टीन व आम्ल हे जॅमचे महत्त्वाचे घटक आहेत. घटक पदार्थ योग्य त्या प्रमाणात एकत्र करून घट्टपणा येईपर्यंत (68 अंश ब्रिक्‍स) येईपर्यंत शिजविले जातात. जॅम तयार करताना त्यातील घटकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावा.

जॅम तयार करतानासुद्धा गरातील विद्राव्य घटकांचे प्रमाण हॅण्ड रिफ्रक्‍टोमीटरच्या साह्याने व आम्लता अनुमापन पद्धतीने काढावी. समजा 100 किलो मिक्‍स फ्रूट जॅम तयार करावयाचा आहे म्हणजे जॅममध्ये शेवटी घटक पदार्थ खालीलप्रमाणे असतील.
फळांचा गर ः 45 टक्के म्हणजे 45 किलो
आम्लता ः 0.5 टक्का म्हणजे 0.5 किलो
पेक्‍टीन ः 0.5 टक्का म्हणजे 0.5 किलो
ब्रिक्‍स ः 68 अंश ब्रिक्‍स
सामू ः 3 ते 3.5
स्वाद ः 0.13 टक्के म्हणजे 130 मि.लि.
रंग ः 10 ग्रॅम (दहा मि.लि. ग्रॅम ); म्हणजेच 0.1 ग्रॅम/ किलो
उदाहरणार्थ ः
मिश्र फळांच्या गरामध्ये 12 टक्के एकूण विद्राव्य घटक व आम्लता 0.7 टक्के आहे. या गरापासून 100 किलो जॅम तयार करावयाचा आहे, तर लागणारे घटक पदार्थ खालीलप्रमाणे असावेत.
1) फळांचा गर : 45 टक्के म्हणजे 45 किलो गर
2) फळांच्या गरामधील एकूण विद्राव्य घटक (घनपदार्थ)
100 किलो गरामध्ये 12 किलो एकूण विद्राव्य घटक असतात, त्यामुळे 45 किलो गरामध्ये 5.4 किलो विद्राव्य घटक असतील.
3) फळाच्या गरामधील आम्लता :
100 किलो गरामध्ये 0.7 टक्का आम्लता असते. त्यामुळे 45 किलो गरामध्ये 0.315 किलो आम्लता असेल.
4) लागणारी साखर ः 100 किलो जॅममध्ये 68 अंश ब्रिक्‍स (एकूण विद्राव्य घटक) असले पाहिजेत.
साखर = 68 किलो (घनपदार्थ किंवा विद्राव्य घटक)
=68 - (लागणारे आम्ल + लागणारे पेक्‍टीन + फळाच्या गरातील विद्राव्य घटक)
= 68 - (0.5 + 0.5 + 5.4)
= 61.6 किलो साखर
5) लागणारे ऍसिड = (लागणारे ऍसिड - गरामधील आम्लता)
= 0.5 - 0.315
= 185 ग्रॅम सायट्रिक ऍसिड
6) लागणारे पेक्‍टीन = 0.5 टक्का म्हणजे 0.5 किलो
7) पेक्‍टीनचे द्रावण तयार करणे : 0.5 किलो पेक्‍टीन 2.5 किलो साखरेमध्ये चांगले मिसळावे. त्यामध्ये 9.5 लिटर पाणी मिसळून मिश्रण चांगले ढवळावे. थोडे गरम करावे. साखर चूर्ण विरघळल्यानंतर मलमलच्या कापडाने द्रावण गाळावे, द्रावणाचे वजन करावे. द्रावणाचे वजन 12.5 किलो असावे.
9) सायट्रिक ऍसिडचे द्रावण तयार करणे.
185 ग्रॅम सायट्रिक ऍसिड 185 मि.लि. पाण्यात चांगले मिसळावे. म्हणजे 370 ग्रॅम द्रावण तयार होते.
100 किलो जॅम तयार करण्यासाठी लागणारे घटक पदार्थ
1) फळांचा गर ः 45 टक्के
2) साखर ः 61.6 किलो (पैकी 2.5 किलो पेक्‍टीन द्रावण करण्यास व उर्वरित साखर)
म्हणजेच 61.6 - 2.5 = 59.1 किलो साखर
2) पेक्‍टीन ः 0.5 किलो (12.5 किलो पेक्‍टीन द्रावण)
4) ऍसिड (सायट्रिक ऍसिड) 0.15 कि. (0.370 कि. आम्ल द्रावण)
5) स्वाद ः 130 मि.ली. (0.13 टक्का)
6) रंग ः 10 ग्रॅम (दहा मि.लि. ग्रॅम टक्के) म्हणजेच 0.1 ग्रॅम/ किलो
7) परिरक्षक ः 40 पीपीएम सल्फर डाय ऑक्‍साइड किंवा 200 पीपीएम बेन्झॉरक ऍसिड

एफपीओ प्रमाणीकरणानुसार जॅममधील घटक
1) फळाचा गर ः 40 ते 50 टक्के
2) एकूण विद्राव्य घटक ः 68 टक्के (25 ते 40 टक्के इन्व्हर्ट शुगर)
3) आम्लता ः 0.5 ते 1.0 टक्का
4) सामू ः 3 ते 3.5
5) परिरक्षक ः 40 पीपीएम सल्फर डाय ऑक्‍साईड किंवा 200 पीपीएम बेन्झॉइक ऍसिड.

'स्क्वॅश, सिरप व नेक्‍टर'चे प्रमाणीकरण महत्त्वाचे...

डॉ. गीता रावराणे
विविध प्रकारच्या फळांपासून स्क्वॅश, सिरप व नेक्‍टर तयार करता येते. "फ्रूट प्रॉडक्‍ट ऑर्डर'अंतर्गत या प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

प्रमाणीकरणानुसार पदार्थ तयार होण्यासाठी ज्या फळांपासून पदार्थ तयार करावयाचा आहे, त्यातील विद्राव्य घटकांचे प्रमाण व आम्लता माहीत असणे गरजेचे आहे. "हॅण्ड रिफ्रॅक्‍टोमीटर' या यंत्राच्या साहाय्याने एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण कळते.

आम्लता काढण्यासाठीची पद्धत
1) रासायनिक द्रावण
1) सोडिअम हायड्रॉक्‍साईड = 0.1 प्रसामान्यतेचे सोडिअम हायड्रॉक्‍साईड तयार करावे. यासाठी चार ग्रॅम सोडिअम हायड्रॉक्‍साईड उर्ध्वपातित पाण्यात मिसळून त्याने अंतिम द्रावण एक लिटर तयार करावे.
2) फिनॉलप्थेलिन दर्शक
कृती ः 1) पाच ग्रॅम फळांचा रस / गर शंकूपात्रात घेऊन त्यात 10 ते 15 मि.लि. उर्ध्वपातित पाणी मिसळून द्रावण तयार करावे आणि गाळून घ्यावे.
2) गाळलेल्या द्रावणामध्ये दोन ते तीन थेंब फिनॉलप्थेलिनदर्शक टाकून द्रावण चांगले एकजीव करावे.
3) मोजनळीमध्ये 0.1 प्रसामान्यतेचे सोडिअम हायड्रॉक्‍साईडचे द्रावण भरून, द्रावणाच्या साहाय्याने शंकूपात्रातील द्रावणाचा रंग फिकट गुलाबी येईपर्यंत अनुमापन करावे. खालील सूत्रानुसार रसाची / गराची आम्लता काढावी.
अनुमापन (मि.लि.) ु सोडिअम हायड्रॉक्‍साईड प्रसामान्यता (0.1)ु * मि.लि. इक्‍युव्हलंट ऑफ ऍसिड
रसाचे / गराचे वजन
संदर्भासाठी : * ाश.िं - ाळश्रळशर्िींर्ळींरश्रशपीं ुीं. ेष रलळव.
ाश.िं ुीं. ेष लळीींळल रलळव = 0.06404
ाश.िं ुीं. ेष रलशींळल रलळव = 0.06005
स्क्वॅश, सिरप व नेक्‍टर इ. पदार्थ कोणत्याही फळापासून तयार करताना फळाच्या रसामधील / गरामधील एकूण विद्राव्य घटक व आम्लता काढावी. तयार करायच्या पेयामध्ये आम्लता व साखरेचे प्रमाण संतुलित करताना रसामधील आम्लता व घनपदार्थ (ब्रिक्‍स) वजा करावेत.

स्क्वॅश तयार करण्यासाठी घटक पदार्थांचे प्रमाण कसे काढावे याचे उदाहरण ः
उदाहरणार्थ - समजा, एक किलो फळांचा रस घेऊन त्यात एकूण विद्राव्य घटक 15 डिग्री ब्रिक्‍स व आम्लता 0.3 आहे, असे हॅण्ड रिफ्रॅक्‍टोमीटर व आम्लता काढावयाच्या पद्धतीने समजले. यापासून स्क्वॅश तयार करण्यासाठी 25 टक्के रस, 45 टक्के विद्राव्य घटक व 0.75 टक्के आम्लता या प्रमाणीकरणानुसार घटक पदार्थांचे प्रमाण असे काढावे.
श्र फळांचा रस - एक किलो (म्हणजे 1000 ग्रॅम)
श्र एकूण स्क्वॅश =
स्क्वॅशमध्ये फळंचा रस - 25 टक्के पाहिजे
25 ग्रॅम रसापासून 100 ग्रॅम स्क्वॅश तयार होईल,त्यामुळे
1000 ग्रॅम रसापासून 4 किलो स्क्वॅश तयार होईल.

श्र साखर
अ) 100 ग्रॅम स्क्वॅशसाठी 45 ग्रॅम साखर लागते. त्यामुळे
चार किलो (4000 ग्रॅम) स्क्वॅशसाठी 1.800 किलो साखर
लागेल.
ब) 100 ग्रॅम रसामध्ये 15 ग्रॅम एकूण विद्राव्य घटक असतात. त्यामुळे 1000 ग्रॅम फळाच्या रसामध्ये 150 ग्रॅम घन विद्राव्य घटक मिळतात.

क) साखरेचे प्रमाण
स्क्वॅशसाठी लागणारी साखर - रसामधील विद्राव्य घटक
= 1.800 - 150
= 1.650 किलो साखर

4) सायट्रिक ऍसिड
अ) 100 ग्रॅम स्क्वॅशसाठी 0.75 ग्रॅम सायट्रिक ऍसिड लागते. त्यामुळे चार किलो स्क्वॅशसाठी 30 ग्रॅम सायट्रिक ऍसिड लागते.
ब) 100 ग्रॅम रसामध्ये 0.3 टक्के आम्लता असते. त्यामुळे
एक किलो रसामध्ये 3 ग्रॅम आम्लता राहील.
क) लागणारे ऍसिड =
25 ग्रॅम सायट्रिक ऍसिड - 3 ग्रॅम रसामधील आम्लता
= 25 - 3 = 22 ग्रॅम सायट्रिक ऍसिड.

5) लागणारे पाणी
रस (1 किलो) + साखर (1.650 किलो) +
सायट्रिक ऍसिड (22 ग्रॅम) = एकूण घटक = 2.87 किलो व उर्वरित भाग पाणी
पाणी = एकूण स्क्वॅश - चार किलो
एकूण घटक - 2.87 किलो
पाणी = (4 - 2.87) = 1.13 लिटर
कोणत्याही फळांच्या रसापासून सरबत, स्क्वॅश व सिरप तयार करताना बनवावयाच्या पेयामधील आम्लता व साखरेचे प्रमाण संतुलित करताना रसामधील आम्लता व घनपदार्थ (एकूण विद्राव्य घटक) वजा करावे.
घटक पदार्थ :
रस = एक किलो
साखर = 1.650 किलो
सायट्रिक ऍसिड = 22 ग्रॅम
पाणी = 1.13 लिटर

एकूण स्क्वॅश = चार किलो
वरीलप्रमाणे घटक पदार्थांचे प्रमाण काढावे. तयार झालेल्या पदार्थामध्ये प्रमाणीकरणानुसार घटक पदार्थ आहेत याची खातरजमा करावी. पुन्हा एकूण विद्राव्य घटक (उदा. 45 टक्के व आम्लता 0.75 टक्के) आणि आम्लता पाहावी. त्यानंतर पदार्थाचे वजन घ्यावे तसेच पदार्थामध्ये परिरक्षक घालावे.

वनशेतीत बिब्बा लागवडीचे महत्त्व

डॉ. दिगंबर मोकाट, गणेश भुवड
बिब्बा या वृक्ष प्रजातीचा उपयोग रंगनिर्मिती, रेझीन, औषधी, साबण उद्योग, तणनाशके, आगरोधक, प्लॅस्टिक, वंगण इ. अनेक उद्योगांसाठी होतो. मात्र जंगलामध्ये आढळणारी ही प्रजाती सध्या दुर्मिळ होत चालली आहे. या प्रजातीच्या फळांचा उपयोग अनेक उद्योगधंद्यात होत असल्याने पडीक जमिनी, माळराने, शासकीय जमिनी, नदीकाठ, बागबगीचे इ. ठिकाणी लागवड करणे आवश्‍यक आहे.

बिब्बा या वृक्षाला हिंदीत "भिलावा', मराठी "बिबू', "बिबा', "बिबवा' संस्कृतमध्ये "भल्लातक' असे म्हटले जाते. शास्त्रीय भाषेत "सेंमीकार्पस ऍनाकार्डीयम' या नावाने ओळखले जाते. आंब्याच्या "अनाकार्डेशी' या कुळातील ही पर्णझडी प्रजाती उष्ण कटिबंधातील पर्णझडी जंगलामध्ये आढळते. हिमालयाच्या पायथ्यापासून ते मध्य भारतातील बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश इ. राज्यांतही मोठ्या प्रमाणात आढळते.

वनस्पती शास्त्र ः
हा मध्यम उंचीचा वृक्ष असून पाच ते सात मीटरपर्यंत वाढतो. याची पाने साधी, शेंड्याला गोलाकार, पृष्ठभाग, गुळगुळीत, पाठीमागून खडकाळ असतात. पाने काहीशी हृदयाकृती, पानांचा कडा काहीशा सरळ रेषेत ओल्या असतात. पानांत मुख्य शिरेवर 15 शिरा असतात. फुले हिरवट- पांढरट, छोटीशी देठ असतात. फळे एक इंच आकाराची असतात. काळ्या रंगाची बी यास "नट' असे म्हणतात. काजू प्रमाणे बिब्ब्याचे बोंड येते, ते पिकल्यानंतर पिवळे होते. हे भाजून खाल्ले जाते. बिब्ब्याला जुलै-ऑगस्टमध्ये फुले येण्यास सुरवात होते आणि परिपक्व फळे जानेवारी-मार्च या कालावधीत मिळतात.

रोपवाटिका आणि लागवड ः
बिब्ब्यांची परिपक्व फळे झाडाखालून जमा करावीत. फळांचा आकार मोठा असतो. रंगाने गर्द काळी फळे रोपनिर्मितीसाठी वापरावीत. सुप्तावस्था मोडण्यासाठी बी 10 ते 15 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवून दोन दिवस कोमट पाण्यात ठेवावे. त्यानंतर ओल्या गोणपाटात बांधून ठेवावे. या पद्धतीने संस्कार केल्यानंतर बी पिशवीत पेरावे. 5 ु 8 इंच आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या पिशवीमध्ये उच्च दर्जाची रोपे तयार करता येतात. रोपे दोन ते चार फुटांची झाल्यानंतर ती 2 ु 2 ु 2 फूट आकाराचे खड्डे घेऊन त्यात लावावी. लागवडीपूर्वी खड्डे भरतेवेळी मातीत सुपर फॉस्फेट, सेंद्रिय खत, शेणखत, हिरवळीचे खत आवश्‍यकतेनुसार टाकावे. लागवड मध्यम, हलक्‍या, निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. आवश्‍यकतेनुसार पाणी, खत, तण व्यवस्थापन करावे. पाच-सात वर्षांत झाडे फळे येण्यास सुरवात होते. सद्यःस्थितीत फळे 50 ते 60 रु. प्रति किलो दराने विकली जातात. लागवडीसाठी राष्ट्रीय औषधी अभियान, रोजगार हमी योजनांमधून अनुदान प्राप्त होते. यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव कृषी विभागाकडे देणे आवश्‍यक आहे.

बहुपयोग बिब्ब्याचे ः
बिब्बा फळांपासून काळा रंग मिळतो. तो कपड्यावर घट्ट बसतो. धोब्याकडे कपड्यांवर नावे टाकण्यासाठी आणि गोंदणासाठी हा रंग वापरला जातो. म्हणून यास इंग्रजीत "मार्किंग नट' म्हणून संबोधले जाते. पूर्वी कपड्यांना रंग देण्यासाठी वापर केला जात असे. सद्यःस्थितीत "वॉर्निश' "पेंट' बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये बिब्बा तेलाचा वापर केला जातो. बिब्बा फळात जे रसायन असते, त्याचा वापर वॉटर प्रूफिंग साहित्य, वेगवेगळ्या रंगनिर्मितीसाठी केला जातो. निवडणुकीत बोटावर मार्किंग करण्यात येणारी शाईही बऱ्याचदा बिब्ब्यापासून बनविली जाते. बिब्बा फळांत मोठ्या प्रमाणात "फिलॉल' रसायन असते. त्याचा वापर वॉटर प्रूफिंग साहित्य, रंगनिर्मितीसाठी केला जातो. अर्धवट वाळलेले तेल लाकूड पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी लाकडांना लावले जाते. गाड्यांच्या ऍक्‍सलला वंगणासाठी तेलाचा वापर होतो. या वृक्षांचा उपयोग लाखेचे किडे वाढविण्यासाठी केला जातो. टॅन, टॅनिन काढण्यासाठी फळांचा वापर केला जातो. आयुर्वेदासारख्या औषधी पद्धतीत अनेक औषधी बिब्बा फळांपासून बनविल्या जातात. बिब्बा वापरण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण करणे आवश्‍यक असते. फळांचा वापर अस्थमा, कफ, मेदूविकार, फीट, सांधेदुखी, घशाचे विकार, कुष्ठरोग, मूळव्याध इ. विकारात केला जातो. परंपरागत औषधी पद्धतीत मुळे, बिया, पाने वापरली जातात.